Wednesday, April 17, 2013

छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर 1680 च्या सुमारास संभाजीराजे गादीवर बसले.

तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत (1689) चा हा केवळ नऊ वर्षांचा काळ महत्त्वाचा आहे.”
“अवघे तेवीस वर्षांचे वय. औरंगजेब, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी अशी गनिमांची संकटे चहूबाजूंनी
स्वराज्याला गिळंकृत करण्यास आली होती. मात्र त्याही स्थितीत संभाजीराजे संकटांवर केवळ
स्वार झाले नाहीत; तर त्यांनी सर्व आक्रमकांच्या उरात धडकी भरवली. त्या नऊ वर्षांच्या काळात
त्यांनी केवळ स्वराज्याचे संरक्षण केले नाही तर संवर्धनही केले. स्वराज्याचा निम्म्या भारतात विस्तार केला.
राजपुतांची साथ मिळाली असती तर ते दिल्लीचे तख्तही ते काबीज करू शकले असते.
ही कामगिरी “केवळ अद्‌भुत’ म्हणता येईल अशीच आहे. जगात त्याची तुलना होऊ शकत नाही.
उण्यापुऱ्या नऊ वर्षांत एकही पराभव, तह वा माघार नसलेल्या 240 लढाया त्यांनी केल्या.
सैन्यदल अफाट वाढवले. तंजावर (कर्नाटक), मद्रास (मदुराई), पावणकोट, त्रिचनापल्ली (तमिळनाडू),
पाटणा (बिहार), बंगालपर्यंत फौजा घुसवल्या. खजिना दुप्पट केला. शिवाजी महाराजांच्या राज्याचा
विस्तार पाच हजार किलोमीटरपर्यंत वाढवला.
नऊ वर्षांत 240 लढाया करणारे युवराज संभाजीराजे दिवसाच्या 24 पैकी 20 तास घोड्यावर असत.
त्यांनी पत्नीला प्रशासकीय हक्क, अधिकार, स्वतंत्र शिक्का देऊन राज्य कारभार करायला प्रोत्साहन दिले.
स्वराज्याचा स्वतंत्र दारूगोळा कारखाना काढला. तरलता तोफखाना काढला. जंजिऱ्याजवळ पूल बांधला.
नवी गावे बसवली. व्यापारी पेठा बसवल्या. धरणे बांधली. लढाईमुळे विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसनही केले.
आरमार वाढवून दर्यावर हुकमत निर्माण केली. चार नवे किल्ले बांधले. पराक्रमी सैनिकांना बक्षिसे दिली.
लढाईत मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबांची सोय केली. हे सारे करण्यास त्यांना केवळ नऊ वर्षे मिळाली.
वाटते तेवढे सोपे नाही. अद्‌भुत, अचाट, अतुलनीयच ठरेल.”
“संभाजीराजांनी शत्रूंवर एवढी जरब बसवली, की मुअज्जम आणि शहाबुद्दीन यांनी दोन बाजूंनी घेरण्याची
व्यूहरचना केली असताना गोवेकरांनी त्यांना मदत करण्याचे धाडसदेखील केले नाही. उलट संभाजीराजांचा
मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी राजधानीच बदलली.
मोगलाईला धोका होता म्हणून…
“”मराठ्यांचे स्वराज्य रयतेचं, तर सर्व शाह्या या बादशहांच्या होत्या. स्वराज्याचा प्रयोग भारतभर पसरण्याचा धोका होता
बुंदेलखंड त्याचे उदाहरण होते.
म्हणून औरंगजेब सर्व ताकदीनिशी स्वराज्य उद्‌ध्वस्त करण्यास दक्षिणेत आला.
पण स्वतःचं राज्य समजून मराठी जनता प्राणपणानं लढली. संभाजीराजांचं हौतात्म्य त्यांच्यासमोर आदर्श होता.
म्हणून औरंगजेबाचं स्वप्न अपुरं राहिलं. त्याला पुन्हा उत्तरेलाही जाता आलं नाही. त्याचा महाराष्ट्रातच अंत झाला.”

4 comments: