Friday, March 29, 2013

।।लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू।।

छत्रपती राजर्षी शाहूंचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई या दांपत्याच्या पोटी झाला.छत्रपती राजर्षी शाहूंचे पूर्वाश्रमाचे नाव यशवंतराव होते.
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्युनंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले.लहानपणापासून ते शरीरयष्टीने तगडे व बलवान होते.विद्यार्थीदशेत त्यांनी विविध भाषेवर प्रभुत्व मिळविले.त्यांचे शिक्षण राजकोट,धारवाड येथे झाले.
बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला.त्यांना राजाराम,शिवाजी हे मुलगे तर आक्कासाहेब,आऊबाई या दोन कन्या होत्या.सन १८९७-९८ साली पडलेल्या दुष्काळ व प्लेगच्या साथीचा त्यांनी कुशलपुर्वक मुकाबला करून प्रजेला त्यातून बाहेर काढले.



वेदोक्त प्रकरण
सन १८९९ साली कोल्हापूरातील धर्मपंडितानी शाहूंना शुद्र ठरवून त्यांचे क्षत्रियत्व अमान्य केले आणि शाहूंचा वेदमंत्राचा अधिकार नाकारला.अशावेळी शाहूंनी कठोर निर्णय घेऊन ब्रह्मवर्गांची वतने बरखास्त केली.वेदोक्त प्रकरणामुळे त्या काळात महाराष्ट्रात मोठे वादळ उठले होते.

No comments:

Post a Comment